Subscribe RSS


'जांभूळ आख्यान' संपले
महाराष्ट्राचे लोकशाहीर विठ्ठल उमप याचं आज नगपुर इथे निधन झालं. उमप यांचा नागपुरात जाहीर कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर चक्कर आली व ह्रदय विकाराच्या तीव्र झटका आला. आणि त्यांनी हजारो प्रेक्षकांच्या समोर जगचा निरोप घेतला. लोकशाहीर विठ्ठल हे ८० वर्षांचे होते. लोककला, अभिनय क्षेत्रात शाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.

शाहीर विठ्ठल उमप यांना संगीत-नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

दलित समाजात जन्माला आलेल्या विठ्ठल उमपांनी आयुष्यभर जीवनाशी उघड संघर्ष केला. अनेक कडू अनुभव गाठीशी बांधले. पण त्याची छाया आपल्या कलेवर पडू दिली नाही. वयाच्या ऐंशीव्या वर्षी जांभूळ आख्यान सादर करताना उमपांचा उत्साह, जोश वीस वर्षाच्या तरुणाला लाजवेल असाच असायचा. अफाट निरीक्षणशक्तीच्या जोरावर त्यांनी जांभूळ आख्यानाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करुन सोडलं.

वयाच्या आठव्या वर्षी गायनाला सुरवात करणाऱ्या उमपांनी लोककला, अभिनय, गायन, रंगभूमी, सिनेमा अशा सर्वच क्षेत्रात चतुरस्त्र संचार केला. आकाशवाणीवर तब्बल 45 वर्षे ते गायले. वयाच्या आठव्या वर्षीपासुन ते ८० व्या वर्षीपर्यत सतत लोककलेची सेवा केली.

कामगार कल्याणच्या व्यसनमुक्ती, सामाजिक जागृतीच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी 30 वर्षे योगदान दिलं. त्यांची जवळपास एक हजाराहून अधिक ध्वनीमुद्रित गाणी उपलब्ध आहेत.

फू बाई फू या गाण्याने महाराष्ट्राला अक्षरश: वेड करुन सोडलं. कोळी नसूनही ये दादा आवर ये या कोळीगीताला एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलं. आंतरराष्ट्रीय महोत्सवातही आपल्या कलागुणांच्या जोरावर त्यांनी आपली छाप उमवटली. जाम्बुळ आख्यान हे त्याचे गाजलेले नाटक आहे.

शाहीरी कार्यक्रम असोत की आंबेडकरी जलसे आपल्या बुलंद आवाजाने ते लोकांच्या थेट हदयात पोहचत असत. आयुष्याची उमेदीची वर्षे दारिद्र्यात घालवूनही लोककलेला समृध्द करणारा हा हाडाचा कलावंत चिरकाल रसिकांच्या मनात घर करुन राहिल.


॥ गणपती बाप्पा मोरया ॥

सकल विद्येची देवता, बुद्धीचा दाता, असा विश्व्वविनायक गजानन गणपती. श्रावण सपताच कोकणात सार्‍याना वेध लागतात ते गणेश चतुर्थदशीचे सर्वत्र तयारी होते ती गणरायाच्या स्वागताची . कोणी रंग रंगोटी करतो तर कोणी आरास करण्यात मग्न असतो. काही ठिकाणी फ़ुलाचा आरास असतो तर काही मकराचा , कोणी खरेदित व्यस्त असतात तर काहि टाळ , मृदंग, तबला , ढोलकी तयार करण्य़ात. लहानापासुन थोरापर्यत सर्व आपापल्या परिने गणरायाच्या तयारीत व्यस्त असतात.
कोकणात सर्वत्र धुम असते ती भगवान लोकरे व त्यांनी गायलेल्या गाण्यांची. कुठे "नारायणी नमोस्तुते" ऎकायला येते तर कुठे
यारे नाचु वाळवंटी" ,"भक्ताचिया गावा आला" या कॅसेट व सि.डि. कोकणात मालवण पासुन ते थेट मुंबई पर्यत गणरायाच्या रांगात रंगुन जातात.
बाप्पाचे गजर , अभंग, भजनात सारे दिन रात मग्न असतात.
या वर्षी भगवान लोकरे बुवाची या वर्षी "रत्नागिरी हापुस देवगड हापुस" ही कॅसेट व सि.डि. सध्या बाजारात आली आहे. बुवा श्री श्रीधर मुणगेकर याच्या गाण्यांबरोबर डबलबारीत धमाल गजर, अभंग, गौळणी गायल्या आहेत. या कॅसेट व सि.डि. विशेष म्हणजे यातील गजर, अभंग, गौळणी. य़ा स्वतः भगवान लोकरे त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.


कोकण कला भूषण ही पदवी सर्व प्रथम श्री चंद्रकांत कदम त्यांस देण्यात आली. आपल्या वयाच्या १६ व्या वर्षा पासुन त्यांनी डबलबारीस सुरवात केली.आपल्या भारदस्त व जबरदस्त आवाजाने त्यांनी रसिकांची मने जिंकली.मुळ्चे ते देवगड आरे या गावाचे. त्यांनी लहानपणापासुन भजानाचे धडे घेतले.
भजन क्षेत्रात त्यांनी अनेक नव्या सुधरणा केल्या. त्यांचे भजन म्हटले की त्याचे असंख्य असे श्रोते जमा ह्यायचे . नवनवीन गाण्याच्या चाली व अर्थपुर्ण अशी गाणी हे त्यांचे विशेष. त्यांचे अभंग हे विशेष अर्थपुर्ण असायचे. ते गात असताना अभंगाचे अर्थ व त्याचे विश्लेषण करुण सांगायचे. त्यांनी अनेक गाणी रचली .त्यांच्या अनेक कॅसेट व सि.डि खुप लोकप्रिय आहेत. यापैकी "बाप्पा मोरया" ही कॅसेट खुप प्रसिद्ध आहे .
आज महाराष्ट्रात त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या पावलावर पाउल ठेवत आहेत. यापैकी "कोकण कला भूषण- भगवान लोकरे" हे एक आहेत. पण त्यांचे सर्वात आवडते शिष्य म्हणजे "लक्ष्मण गुरव".गुरुच्या स्वर्गवासानतर ही ते आज ही मनापासुन सेवा करत आहेत . असेच कशिराम परब हे ही आज कदम बुवाचा वरसा पुढे चलवत आहेत.
आज ही श्री चंद्रकांत कदम त्यांचे नाव घेतले कि, आठवण येते ती पर्शुराम पांचाळ, विलास पाटील , वामन खोपकर अशा अनेक बुवाची.
आज ही लोक कदम बुवाची गाणी आवडीने ऎकतात.

"कोकण कला भूषण "ही विशेष पदवी भगवान लोकरे त्यांस त्यांच्या भजनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आली आहे.
भगवान लोकरे त्यांनी या माध्यमातुन कोकणची मागील ४० वर्षे अविरत सेवा केली व करत आहे. आपल्या सुस्वर आवाजाने त्यांनी रसिकांना मने जिंकली आहेत.
त्यांच्या "नारायणी नमोस्तुते" ,"यारे नाचु वाळवंटी" ,"भक्ताचिया गावा आला"या कॅसेट व सि.डि खुप लोकप्रिय आहेत. त्यांच्या ही कला विशेष वाखाण्याजोगी आहे. "कोकण कला भूषण"श्री चंद्रकांत कदम व संगीतरत्न श्री प्रमोद दीक्षित हे त्यांचे गुरु. दोघे ही संगीताचे उत्तम जाणकार. दोघअकडुन त्यांनी संगीताचे धडे गिरवले.
या ४० वर्षे इतिहासात त्यास उत्तम अशी साथ दिली ती श्री. श्रीधर मुणगेकर , श्री. रामदास कासले, श्री. प्रमोद हर्याण या सरख्या अनेक कोकण सुपुत्रानी. या बुवा बरोबर त्यानी अनेक डबलबारी केल्या. अनेक ठिकाणी त्यानी गाजवलीत. आज ही लोक
वाट पाह्तात ती भगवान लोकरे याच्या नवनविन गाण्याची .
या ४० वर्षे इतिहासात त्यास उत्तम अशी साथ दिली ती त्याच्या श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ भांडुप व रत्नागिरी पूर्णगड. यात श्री दादा सावंत, श्री कृष्णा लाड ,
इ. अनेक जणाचा सहयोग लाभला. त्यास पखवाजाची साथ दिली ती श्री बाळू थोरवे श्री रवींद्र जुवाटकर , श्रीदिनकर भगत . श्री विजय सावंत , श्री प्रदीप डोर्लेकर इ.
कोरस लाभला तो श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, भांडुप त्यांच्या श्री.दिलीप पाटणकर , नाटॆकर, मुकेश ,चेतन, रतन लोकरे ,विक्रम कोयन्डे , रोशन ढवण, चंदू जाधव , इ. यानी .आपल्या या कोरसच्या साथीने त्यानी अनेक स्प्रर्धेतील चषकावर आपले नाव कोरले आहे.
बुवा श्री भगवान लोकरे त्यांनी अनेक शिष्य घडवले व आज त्यांचा ते वरसा महाराष्ट्र व कोकणात चालवत आहेत.या मध्ये बुवा श्री दिलिप पाटणकर ,बुवा कै श्री अरुण सावत ,बुवा श्री अजय भोवड, बुवा श्री नितिन साटम.
आता गणपति आला की त्याच्या गांण्य़ाची सी.डी घराघरात पहाण्यास मिळतात.
कोकणात तर त्याची प्रत्येक चाहत्याच्या तोंडात ऎंकावयास मिळते.

Locations of visitors to this page